Saturday, August 25, 2012

समोर तो ब्रिज दिसतोय ना

एकदा मनमोहन सिंघ ओबामाच्या घरी गेला..
त्याचा बंगला बघून मनमोहन ने विचारलं..
इतका मोठा बंगला...
इतके पैसे कुठून आले?
ओबामा - तो समोर ब्रिज दिसतोय?
मनमोहन - हो...
ओबामा - त्यातले १०%खिशात घातले...
काही दिवसांनी ओबामा मनमोहन कडे गेले..
ओबामा - हा तर माझ्या बंगल्यापेक्षा मोठा बंगला आहे..
इतके पैसे कुठून आले?
मनमोहन - समोर तो ब्रिज दिसतोय?
ओमाबा - नाही....
मनमोहन - हा हा हा .....
कळला तर लाईक करा...

पहिला कोण होता

वांद्रय़ाच्या चर्चच्या हद्दीत एक जण थडग्यावर डोकं आपटत म्हणत होता, ‘‘का
मेलास? का मेलास तू?’’
कुणी जवळचा होता का? एकानं विचारलं,तेव्हा तो म्हणाला, ‘‘त्याचे तोंड मी
बघितलही नव्हतं हो.’’
हा माझ्या बायकोचापहिला नवरा होता.
** * **

परदेश दौरा

परदेश दौऱ्यावर मंत्र्यांचा खूप खर्च होतो. तो कमी कसा कराल? यासाठी
मंत्र्यांनी परदेशात गेले पाहिजे व ते देश याबाबतीत काय करतात ते पाहिले
पाहिजे.*
*** * **

दुःखद गोष्ट

तीन मित्रांनी मिळून एक फ्लॅट ५० व्या मजल्यावरचा घेतला. (लिफ्ट) उद्वाहक चालू
नाही असे रखवालदारम्हणाला. आता पायऱ्या चढण्याशिवाय गत्यंतर नाही. वेळ
घालविण्यासाठी तिघांनी ठरविले की, एकाने संस्मरणीय घटना सांगावी, दुसऱ्याने
विनोद सांगावा व तिसऱ्याने दु:खी गोष्ट सांगावी. असे करता करता ते तिथे
दरवाज्याजवळ पोचले. पहिल्या दोघांनी ठरल्याप्रमाणे त्यांच्या वाटणीची कामे
केली होती. तिसरा म्हणाला, ‘‘मी खोलीची चावी आणायला विसरलो, ही माझी दु:खद
गोष्ट आहे.’’
** * **

आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद

एकदा एका रात्री सूर्यकांत दारूच्या नशेत जातहोता. त्याचे एक पाऊल फूटपाथवर
तर एक रस्त्यावर पडत होते. पाठीमागून येणाऱ्या हवालदाराने सूर्यकांतला काठीने
मारत विचारले- ‘‘काय रे, इतकी प्यायला कुणी सांगितली.’’
सूर्यकांत स्वत:लासावरत म्हणाला, ‘‘आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, गेला एक
तासभर मी लंगडत का चालतो आहे.. याचाच विचार करत होतो.’’*
*** * **

इमोशनल अत्याचार

घटस्फोटाचा खटला चालू होता. न्यायाधीशांनी पत्नीला विचारलं, ‘तुम्हाला
घटस्फोट कशासाठी हवा आहे?’
पत्नी- ते माझा मानसिक छळ करतात.
न्यायाधीश- तो कसा?
पत्नी- आधी ते मला वाटेल तसं टाकून बोलतात, आणि मी उत्तर देऊ लागले की कानाचं
श्रवणयंत्र बंद करून ठेवतात.

तिच्या फोनची वाट पाहतेय

‘‘का गं नीता, अर्धा तास कानाला फोन लावून बसली आहेस, कोणाचा फोन आला आहे
गं?’’ आईने नीताला विचारले.
‘अगं कोणाचाही फोन आलेला नाही. अमृता मला फोन करणार आहे,म्हणून मी फोन उचलून
तिच्या फोनची वाट पाहते आहे.’ नीताने उत्तर दिले.

कसं होणार या मुलीँचं

आजचा किस्सा !
गण्या बाईकने चालल होता आणि...
अचानक एक मुलगी गण्याच्या bike ला मागून धडक देते !
गण्या : ए मंद आहेस का! ब्रेक लावायला काय पैशे पडतात??
ती : माझ्या पण activa ला खरचटला आहे काय....
गण्या : bike ची numberPlate तुझ्यामुळे चेम्बली त्याचा काय!
ती : रे मी मुद्दाम नाही केलं, माझी exam आहे १० मिनिटाने plz अरे !
गण्या : हम्म्म... ठिक हाय ठिक हाय...
ती : चल बाय .....टेक केअर..!
.
.
.
(आणि सुसाट गाडी चा pickup घेत "पुढच्या गाडी वाल्या ला धडकली" :D )
कसा व्हायचं या पोरींचं देव जाणे..! :p:D

टन टन टन

सर : एक हजार किलो म्हणजे एक टन,
तर सांग पाहु गण्या...
तीन हजार किलो म्हणजे किती?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गंपू : टन टन टन! :p
(चला मित्रांनो शाळासुटली. हजेरी द्या आणी झोपुन जा ;)...)

आत्ताशी कुठे विशीची आहे

एक कॉलेजची मुलगी कॉलेजला जायला उशीर झाला म्हणून बेदरकारपणे अतिशय फास्ट
स्पीडने कार चालवून सिग्नल तोडून गेल्यामुळे एका पोलिसाने तिलाथांबवलं.
पोलीस तिला म्हणाला-मॅडम, चाळीसच्या पुढे गाडी चालवायची नाही हे तुम्हाला
माहीत नाही का?
ती मुलगी म्हणाली, मी आत्ताशी कुठे विशीची आहे!

फोन माझ्यासाठी होता

फोन वाजताच रोहनने आपल्या पत्नीला- मोनाला सांगितलं,
‘‘ फोन जर माझ्यासाठी असेल तर मी घरात नाहीए म्हणून सांग.’’
मोनाने फोन उचलला आणि सांगितलं, ‘‘तो घरात आहे.’’ रोहन म्हणाला, ‘‘सांगू नको
म्हणून सांगितलं होतं ना.’’ मोनानं उत्तर दिलं, ‘‘फोन माझ्यासाठी होता.’’

चष्मा घरी विसरलोय

रस्त्यात बाबूराव आणि छबूराव यांचे भांडण जुंपले तेव्हा बाबूराव तावातावाने
छबूरावावर ओरडले, ‘बघतो तुला नंतर..!’ त्यावर छबूराव आवेशाने उद्गारले,‘का?
नंतर कशासाठी? आताच का नाही?’, ‘कारण मी चष्मा घरीविसरलोय’ काढता पाय घेत
बाबूराव बोलले.

चष्मा घरी विसरलोय

रस्त्यात बाबूराव आणि छबूराव यांचे भांडण जुंपले तेव्हा बाबूराव तावातावाने
छबूरावावर ओरडले, ‘बघतो तुला नंतर..!’ त्यावर छबूराव आवेशाने उद्गारले,‘का?
नंतर कशासाठी? आताच का नाही?’, ‘कारण मी चष्मा घरीविसरलोय’ काढता पाय घेत
बाबूराव बोलले.

कोमट पाणी

बाबूरावाना तपासून डॉक्टर म्हणाले, ‘‘तुम्हाला मलावरोधाचा त्रास आहे. तुम्ही
रोज सकाळी उठताच ग्लासभर कोमट पाणीप्या.’’ त्यावर बाबूराव उद्गारले,
‘‘डॉक्टरसाहेब, हे तर मी गेली कित्येक वर्षे करतो आहे. फक्त आमची ‘ही’ त्या
पाण्याला ‘चहा’ म्हणते.’’

Friday, August 24, 2012

अरे लाइट लावा

हेमा अशोकबरोबर पहिल्यांदाच सिनेमा पाहायला गेली. सिनेमा सुरू होण्यापूर्वी
थिएटरमध्ये अंधार केला गेला. तेव्हा हेमा एकदम ओरडली. अरे लाईट लावा, अंधारात
सिनेमा कसा बघणार?

Wednesday, August 22, 2012

तिकीट

शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...?
.
.
.
.
.
.
गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..
आणि ड्रायवर जर झोपला....
तर सर्वांचच तिकीट निघेल... :p :D :D
गण्या Rocks ;)

नव्या पिढीचा लाकुडतोड्या

लाकूडतोड्याची गोष्ट सर्वांनाच माहित असेल...
तसंच काहीसं एकदा झालं...
चम्प्या त्याच्या बायकोबरोबर जंगलात जातो..आणि त्याची बायको तलावात पडते.
तो रडत असतो इतक्यातएक देवी येते..
तो देवीला सगळी कहाणी सांगतो..
देवी पाण्यात जाते आणि येताना कॅटरीना घेऊन येते..
देवी - हीच आहे का तुझी बायको?
चम्प्या - हो हो हीच आहे..
देवी - खोटं बोललास तर तुला शिक्षा देईल..
चम्प्या - देवी मला माफ कर..मी खोटं बोललो..
देवी - का बोललास खोटं...आता तुला शिक्षा देणार मी..
चम्प्या - माफ कर देवी.. मी जर कॅटरीना ला नाही म्हणालो असतो..तर तू करीना घेऊन आली असतीस..आणि मी तिलाही नाही म्हणालो असतो तर तू मला माझी बायको दिलीअसतीस..
आणि मी बायकोला हो म्हणालो असतो तर तू माझ्यावर खुश होऊन मला तिन्ही बायका दिल्या असत्यास..
मी खूप गरीब आहे..मला एकच परवडत नाही...३ कधी परवडणार?
देवी - अब रुलायेगा क्या पगले... घेऊन जा जा कॅटरीना ला..
मॉरल - माणसं इमानदारीने गेम खेळतात..

Tuesday, August 21, 2012

मुंग्या vs कोळी फुटबॉल मॅच

एक दिवस
मुंग्या विरुद्धा कोळी अशी फूटबॉलची मॅच
असते.
मुंग्या ना 6 पाय आणि कोळ्या ना 8 पाय
त्यामुळे कोळी दणादण गोल मारतात.
मग interval नंतर मुंग्यांकडून गोम
खेळायला येतात ......
तिला 100 पाय....
त्यामुळे त्या न
थांबता गोल च गोल मारतात
आणि मुंग्या जिंकतात....
मग पत्रकार परिषदमधे सगळे वा वा thanks
गोमा,
तुमच्यामुळे मुंग्या जिंकल्या वगैरे असे कौतुक
करतात ...
पण एक खडूस पत्रकार विचारतो
"तुमच्या मुळे मुंग्या जिंकल्या वगैरे ठीक आहे
पण interval परन्त वेळ का लावला???
भाव खायला काय?".........
तर गोमा मान हलवत म्हणतात
"नाही हो, आधीच येणार होतो पण बूट
घालण्यात फार वेळ गेला !!!!

काही मजेशीर व्याख्या , काही कधीतरी वाचलेल्या , तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का ?

 

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.
बघा आवड्तायेत का?

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)

ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'

परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ

दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन

थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी

विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन

चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

 

श्रेष्ठ विचार

कई लोगोँ की मान्यताहै कि ईश्वर
को पाने के अनेक रास्ते हैँ। लेकिन सोचने
वाली बात है कि अनेक रास्ते किसके लिए
होते हैँ?... जो चीज एकजगह स्थित
होती है। जैसे मान लेँ अमेरिका, वहाँ जाने के
लिए अनेक रास्ते हैँकोई वायुमार्ग से
जाएगा, कोई सड़क से, तो कोई जहाज से
जाएगा क्योँ?.. क्योँकि अमेरिका एक जगह
स्थित है। वहीँ हम देखेँ, हवा, जो सभी जगह
व्याप्त है उसे केवलनाक के
द्वारा ही ग्रहण किया जा सकता है
किसी और अंग कान, आँखआदि के
द्वारा नहीँ।
इसी तरह चूकि वो ईश्वर सर्वव्यापी हैँ
इसलिए उनके पाने का रास्ता भी केवल और
केवल एक ही हो सकता है अनेक नहीँ। हमारे
सभी धार्मिक ग्रंथोँ ने परमात्मा-
प्राप्ति का केवल एकही मार्ग बताया है।
वो है- एक ऐसे पूर्ण गुरु
की शरणागति जो हमेँ दस बीस मार्गोँ मेँ
ना उलझाए बल्कि उस एक ही शाश्वत,
सनातन मार्ग मेँ दीक्षित कर देँ। अर्थात
वो दीक्षा के ही समय हमेँ दिव्य-
दृष्टि प्रदान कर परमात्मा के तत्वरुप
का दर्शन करा देँ। जिसे रा0च0मा0 मेँ
प्रकाश, बाइबल मेँ divine light, कुरान मेँ
नूर, गुरुवाणी मेँ ज्योति कहा गया। शब्द
बेशक अलग हैँ पर है सब एक ही। श्रीकृष्णने
भी अर्जुन से कहा-"दिव्यं ते
ददामि चक्षुः पश्य मे योगमैश्वरम।
अर्थात मैँ तुम्हेँ वो दिव्य-दृष्टि देता हूँ
जिससे तू मेरे वास्तविक स्वरुप को देख
पाएगा।"
उसके दर्शन के बाद ही हमेँ समझ आती है
कि हम हिन्दू, मुस्लिम, सिख, ईसाई
को अलग-अलग समझते हैँ लेकिन वास्तव मेँ हम
सब उस एक परम-ज्योति के ही अंश हैँ और
इसलिए आपस मेँ भाई-भाई हैँ।

Monday, August 20, 2012

आयुष्य | Aayushya

 

 

गण्या Rocks, डॉक्टर shocks!

गण्या : काय डॉक्टर तुम्ही सांगितले होते की खेळ खेळल्याने तब्येत चांगली राहते पण मलातर काहिच वाटत नाही.
डॉक्टर: कोणता खेळ खेळतो तु?
गण्या : मोबाईल मधला तो सापाचा....! :p :D

Sunday, August 19, 2012

चुकलेले गणित | Chuklele Ganit



 

 

 

 

 

 

पुणे बॉम्बस्फ़ोटावर विविध लोकांच्या मनात आणि ओठात काय असेल त्याची एक झलक (Pune Bomb Blast)

मिडिया: (ओठात)ब्रेकिंग न्युज. पुण्यात दहशतवादी हल्ला
(मनात)चला दोन दिवस बातम्या शोधण्याचा त्रास नाही.
——————————————————————
पोलिस:(ओठात)कृपया काळजी करु नये परिस्थीती नियंत्रणाखाली आहे.
(मनात)बोंबला,आता आठवडाभर डे,नाईट ड्युटी…या अतिरेक्यांच्या आयला *****
————————
—————————————————–
पुढारी:(ओठात)जखमींना ५ कोटी आणि मृतांना ५० कोटी सरकारी मदत जाहिर करण्यात येत आहे.
(मनात)आहे त्या योजनांवर खर्च करायला पैसा नाही आणि यांना कुठुन पैसे द्यायचे,असो बोलायला काय जातयं,बाकी माझा बाईट ओके झाला,****चीजळुन लाल झाली असेल
——————————————————————
स्वयंसेवी संस्था : (ओठात)पुण्याला शांततेचा ईतिहास आहेकृपया समाजात दुही माजवु नये असे आवाहन.
(मनात) दोन दिवसांनी मेणबत्ती मोर्चा काढुन त्याचे फ़ोटो पेपरात कसे छापुन येतिल ते पाहिल पाहिजे.साला तो****चा बातमीदार बातमी लावायला आजकालखुप पैसे मागतो
———————————————————————-
हिंदु नागरिक:(ओठात)दहशतवाद्यांना जात नसते त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे.
(मनात)च्यामायला हे मुसलमान खुप माजलेत,साल्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत
———————————————————————
मुस्लिम नागरिक:(ओठात)हम अमन और शांती कायम रखने के लिये दुआ करते है
(मनात)साले हिंदु इस बात का मुद्दा उठाकर अब हमारी ठासने को देखेंगे पर हम भी कच्ची गोलियों से नही खेलते.
————————————————————-
आणि शेवटी या भारताचा गरिब आणि आम नागरीक काय म्हणतो ते पाहु
घरातुन निघताना हा कच्च्या बच्च्यांना पाहुन घेतो,पत्नीला उद्देशुन ओठात) येतो गं……………..
(मनात)जातोय ,…..पण सुखरुप परत आलो तर तुमचा………………….

आता तुम्ही पवित्र टमाटर आणि बटाटे आहात

"मास्टर माईंड गण्या"
प्रत्येक रविवारी गण्या आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शेजारी कठोर कॅथोलीक होते... आणि त्यांना त्यांच्या धर्मगुरुने चिकन आणि मटन खाण्यास मनाई केली होती. परंतू गण्याच्या घरुन येणारी चिकन आणि मटणाची सुगंध त्या कॅथोलीक लोकांना खुप विचलित करत असे. त्यामुळे त्यांनी शेवटी आपल्या धर्मगुरुला या बाबतीत सांगितले.
धर्मगुरु गण्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला आणि त्यांनी त्याला कॅथोलीक बनण्याचा सल्ला दिला. त्या धर्मगुरुने आणि त्याच्या शेजाऱ्यांनी त्याचीखुप मनधरणी केल्यानंतर गण्या अनिच्छेना का होईना एक दिवस कॅथोलीक चर्चमधे त्यांची प्रार्थना अटेंड करण्यास गेला. तो प्रार्थनेसाठी उभा असतांना अचानक त्या धर्मगुरुने गण्याच्या शरीरावर पवित्र पाणी शिंपडले आणि ते म्हणाले, ''तु धर्माने सिख हिंदू, आणि हिँदू म्हणूनच मोठा झाला आहेस, परंतू आता तु कॅथोलीक आहेस''
गण्याचे शेजारी खुप खुश झाले होते...
पण...
.
.
.
पुढील रविवारी पुन्हा गण्याच्या घरातून चिकन आणि मटनाचा सुवास सगळ्या चाळीत पसरला.शेजाऱ्यांनी ताबडतोब कॅथोलीक धर्मगुरुला बोलावले. धर्मगुरु जेव्हा गण्याच्या घराच्या मागच्या बाजुने त्याच्याघरात शिरलेआणि त्याला रागावण्यासाठी तयारच होते, तेव्हा ते अचानक थांबले आणिआश्चर्याने गण्याकडे पाहू लागले.
तिथे गण्या एक छोटी पवित्र पाण्याची शीशी घेवून उभा होता. त्याने ते पवित्र पाणी चिकन आणि मटनावर शिंपडले आणि म्हणाला, '' ओए... तुम्ही जन्माने चिकन आणि बकरा होतास, आणि चिकन आणि बकरा म्हणूनच मोठे झालात , पण यारा आता तुम्ही पवित्र बटाटे आणि टमाटर आहात'' :p :D :D
आवडला तर नक्कीच शेअर करा ;)

आम्हाला असाच मुलगा हवा होता

एकदा माझ्या गर्लफ्रेंडने मला तिच्याघरी बोलावले,
मी तिच्या घरी गेलो, बाइक कडेला लावली आणि बेल वाजवली
.
.
तिच्या छोट्या बहिणीने ... दार उघडले,
ती पण खूप सुंदर होती.
.
.
.
... ती हसून बोलली"तुम्ही खूप हॅन्डसम आहात, आत्ताघरी तर कोणीच नाही.
मी
एकटीच आहे,
आत या ना."
.
.
मी थोडा विचार केला आणि तिला स्माइल देउन परत फिरलो..
.
.
.
तेवढ्यात तिचा सर्व परिवार बाहेर आला..
मुलीचे वडीलः बेटा आम्हाला असाच मुलगा हवा होता.
तु आम्हाला पसंत आहेस...
.
.
.
.
.
.
आता त्यांना काय सांगु मी बाइक लॉक करुन परत येनार होतो...

अती शहाणा त्याचा बैल रिकामा

पुणे रेल्वे स्टेशनवर एक तरुण सोलापूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला.
ज्या डब्यात तो चढला, त्या डब्यातखूप गर्दी होती. म्हणून याने शक्कल लढवली.
मोठ्या-मोठयाने तो साप साप म्हणून ओरडूलागला. डब्यातले सगळे लोक भीतीनेखाली उतरले.
हा मात्र मोठ्या रुबाबात डब्यातल्याएका सीटवर जाऊन तोंडावर पेपर ठेवून झोपी गेला.
जवळपास दीड-दोन तासाने त्याला जाग आली.
तसा तो उठला आणि स्टेशनवर उभ्या असलेल्या माणसाला त्याने विचारलं,"कोणतं स्टेशन आलं हो ?"
माणूस म्हणाला,"पुणेस्टेशन."
"काय? पुणे स्टेशन?",
तो तरुण गोधळून म्हणाला.
"होय, या डब्यात साप होता म्हणून गाडी हाडबा इथेच सोडून सोलापूरला गेली,"

घोर कलियुग

घोर कलियुग !!
चिँगी : माझं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम आहे...
मी पळून जातेय...
.
.
वडील : चांगलं करतेयस.... तू माझे पैसे आणि वेळ
दोन्ही वाचवतेयस!!
.
.
चिंगी : बाबा, मी आईनेतुमच्यासाठी ठेवलेलं पत्र
वाचतेय!! :p :D

Saturday, August 18, 2012

13 Funny meanings of places in English...

13 Funny meanings of places in English...
1. Large State:- महा-राष्ट्र
2. Place of Kings:- राज-स्थान
3. Mr. City:- श्री-नगर
4. Rhythm Of Eyes:- नयनी-ताल
5. Face:- सुरत
6. Unmarried Girl:- कन्या-कुमारी
7. No Zip:- चेन्-नई
8. Come in Evening:- आ-साम
9. Go & Come:-गो-वा(आ)
10. Answer State:- उत्तर-प्रदेश
11. Make Juice:- बना-रस
12. Do Drama:- कर-नाटक(कर्नाटक)
13. Green Gate:- हरी-द्वार
Amazing India......!

Real names in Bollywood

Real names in Bollywood----------
Aamir Khan – Aamir Hussain Khan
Ajay Devgan – Vishal Devgan
Ajit – Hamid Ali Khan
Akshay Kumar – Rajiv Bhatia
Amitabh Bachchan – Amit Srivastav
Ashok Kumar – Kumud Ganguly
Bobby Deol – Vijay SinghDeol
Dev Anand – Devdutt Pishorimal Anand
Dharmendra – Dharam Singh Deol
Dilip Kumar – Yusuf Khan
Govinda – Govinda Arun Ahuja
Jeetendra – Ravi Kapoor
John Abraham – Farhan Abraham
Johnny Lever – Badruddin Qazi
Kamal Haasan- Alwarpettai Aandavar
Kumar Gaurav – Manoj Tulli
Lucky Ali – Maqsood Mehmood Ali
Madhubala – Mumtaz Jehan Begum Dehlavi
Mahima Chaudhry – Ritu Chaudhry
Mallika Sherawat – Reema Lamba
Manoj Kumar – Hare Krishna Goswami
Nana Patekar – Vishwanath Patekar
Raj Kumar – Kulbushan Pandit
Rajesh Khanna – Jatin Khanna
Rajnikant – Sivaji Rao Gaykwad
Rekha – Bhanurekha Ganesan
Salman Khan- Abdul Rashid Salim Salman Khan
Sanjeev Kumar – Haribhai Jarivala
Shammi Kapoor – Shamsher Raj Kapoor
Shashi Kapoor – BalbirrajKapoor
Sunil Dutt – Balraj Dutt
Sunny Deol – Ajay Singh Deol
Tuntun : Uma Devi Khatri

Friday, August 17, 2012

Nach Re Mora - नाच रे मोरा

नाच रे मोरा.... ग.दि.माडगूळकर ( बालगीते,अंगाई गीते,संस्कारगीते,स्फूर्तीगीते संग्रह ) महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना गदिमा या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे अण्णा तर नातवंडांचे पपाआजोबा अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर..... तुकारामाची गाथा जशी पाण्यात न बुडता तरंगत राहिली तसेच गदिमांनी लिहिलेले शब्द हे काळाच्या ओघात विरून न जाता प्रत्येक जणाच्या मनात अजूनही तरंगतआहेत. पूरिया, जोगिया यासारखे काव्यसंग्रह असोत किंवा 'या चिमण्यांनो' 'माझा होशिल का?' ' जिंकू किंवा मरू' यांसारखे गीतप्रकार असोत. गदिमांचे शब्द हे प्रत्येकांच्या मनाशी अगदी अलगदपणे संवाद साधतात. गीतरामायणाशिवाय तर घरात रामजन्म साजरा होतचं नाही. "नाच रे मोरा" ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात 'चंदाराणी','शेपटीवाल्या प्राण्यांची','एक कोल्हा बहु भुकेला','चांदोबा चांदोबा भागलास का?' यांसारखी बालगीते किंवा 'जिंकू किंवा मरू','वंद्य वंदे मातरम्‌' सारखी

बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Polyachya shubhechha

श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.'
पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचाआजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊनत्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंगलावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशानाना तर्‍हेने सजविण्यात येते.
शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्‍नीक वाजत गाजतजातात व त्याला 'अतिथी देवोभवो' प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या रोजी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते.शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते.
महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेचशर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फेझूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यांनतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते.अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला जातो.
याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवासकरून सायंकाळी स्नान करतात. चौसष्टयोगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात.घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ' अतित कोण ?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

पोळा विशेष (Pola)

आला आला शेतकर्‍या
पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्या
आतां शेंदूराले घोटा
आतां बांधा रे तोरनं
सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या
लावा शिंगाले शेंदुर
लावा शेंदूर शिंगाले
शेंव्या घुंगराच्यालावा
गयामधीं बांधा जीला
घंट्या घुंगरू मिरवा
बांधा कवड्याचा गेठा
आंगावर्‍हे झूल छान
माथां रेसमाचे गोंडे
चारी पायांत पैंजन
उठा उठा बह्यनाई,
चुल्हे पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद
पुरनाच्या पोया ठेवा
वढे नागर वखर
नहीं कष्टाले गनती
पीक शेतकर्‍या हातीं
याच्या जीवावर शेतीं
उभे कामाचे ढिगारे
बैल कामदार बंदा
याले कहीनाथे झूल
दानचार्‍याचाज मिंधा
चुल्हा पेटवा पेटवा
उठा उठा आयाबाया
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया
खाऊं द्या रे पोटभरी
होऊं द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी
आज करूं या बागूल
आतां ऐक मनांतलं
माझं येळीचं सांगन
आज पोयाच्या सनाले
माझं येवढं मांगन
कसे बैल कुदाळता
आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधतां
बाशिंगाचं डोईजड
नका हेंडालूं बैलाले
माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस
आन बैलाले तरास
आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सन
शेतकर्‍या तुझं रीन

पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.....!
पोळा श्रावण
अमावास्या
या तिथीला साजरा करण्यात
येतो.पोळ्यास
बैलपोळा असे देखील
म्हणतात.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त
करणारा हा सण
आहे.ज्यांचेकडे
शेती नाही ते
मातीच्या बैलाची पूजा करतात.
शेतीप्रधान
या देशात, व
शेतकऱ्यांत
या सणाला विशेष
महत्व आहे.या वेळेस
पावसाचा जोर
कमी झालेला असतो.शेतात
पिक/धान्य
कापणीला आलेले असते.
सगळीकडे हिरवळ
असते. श्रावणातले सण
संपत आलेले
असतात.एकुण आनंदाचे
वातावरण असते.
या दिवशी,
बैलांचा थाट असतो.
या दिवशी त्यांना कामापासुन
आराम असतो.
तुतारी(बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात
येणारी काडी ज्याचे
टोकास,
बैलांना टोचण्यासाठी टोकदार
लोखंडी खिळा लावला असतो)
वापरण्यात येत
नाही.
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण
(आवतण) देण्यात येते.
पोळ्याला त्यांना नदीवर/
ओढ्यात नेउन धुण्यात
येते. नंतर चारुन
घरी आणण्यात येते.
या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान
व शरीराचा जोड-
खांदा) हळद व तुपाने
(सध्या महागाईमुळे
तेलाने) शेकल्या जाते.
त्यांचे पाठीवर
नक्षिकाम केलेली झुल
(एक प्रकारचे
चादरीसारखे आवरण),
सर्वांगावर गेरुचे
ठिपके, शिंगांना बेगड,
डोक्याला बाशिंग,
मटाट्या (एक
प्रकारचा श्रुंगार)
गळ्यात कवड्या व
घुंगुरांच्या माळा,
नवी वेसण, नवा
कासरा
(आवरायची दोरी)
पायात चांदीचे
वा करदोड्याचे तोडे,
खायला गोड
पुरणपोळी व सुग्रास
अन्नाचा नैवेद्य.
बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी'
घरगड्यास नवीन कपडे
देण्यात येतात.

रावण Facts!

रावण Facts -
1. रावण शाळेत असतानात्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे.
2. रावण १०-१० टोप्या घालायचा.
3. शिवाय एकाच वेळेला१० प्रकारच्या मुखशुद्धी पावडरी पण खायचा.
4. लहानपणी रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावुन
... द्यायची हा प्रश्नअसायचा.
5. कुठच्याही साध्या म्युझिकसिस्टिमव र गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी
डिजिटल सराउंड साउंड ऐकू यायचं.
6. रावण कधीच कुशीवरझोपू शकायचा नाही.
7. रा
वणाला कधीच टी शर्ट घालता आला नाही.
8. रावण एका तोडांने पान खायचा व सर्व तोंडे लाल व्ह्यायची. कारण ती
ईंटरकनेक्टेड होती अशी माहीती एका गाईडने सांगितली होती.
9. रावण दहा सिगारेटचे एक पाकिट एकदम संपवत असे.
10. रावण सलून मध्ये गेला कि न्हाव्याला त्याचे काम दिवसभर पुरत असे.
11. मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे ठिपके लावीत होती.
12. रावण एकटाच समूह गीत म्हणायचा.
13. रावण एकटाच लंकन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आणि महाफायनलचा
महाविजेता व्हायचा.
14. होळीला रावण एकटाच दहा वेगवेगळ्या स्टाईलने बोंबलायचा.
15. रावणाच्या लग्नात मंदोदरीच्यावडिलांनी २०
हारांची ऑर्डर नोंदवली होती.
16. रावणाला ढेकर आलीकी त्याला कुठल्या तोंडाने बाहेर काढावी हे समजत नसे.
17. रावण एकटाच ग्रुपडिस्कशन करत असे.
18. रावणाचे बहुतेक मास्तर म्हणत असत"एक गोष्ट दहा वेळा सांगावी लागते''.
आवडला तर नक्की शेअरकरा...!!!

Thursday, August 16, 2012

टाइमपास

टाइमपास सिँघमः तुम्ही आजपर्यँत फेसबुकवर लोकांना एखादा जोक लाइक करतांना पाहीलं असेल, कॉमेँट करतांना पाहिलं असेल.. पण कधी जोक वाचल्यानंतर कपडे फाडुन लोळतांना पाहिलं नसेल, पाहायचं असेल तर लाइक करा भन्नाट पेज => टाइमपास http://www.facebook.com/on.timepass

25 वर्षानंतरच्या बातम्या :D

पंचवीस वर्षानंतरच्या बातम्या
१. शरद पवार ह्यांची UNO च्या अध्यक्ष
पदी निवड.UN च्या कामकाजात
पारदर्शकता आणण्याचा विचार. IPL ३०
मध्ये
UN ची टीम खेळवण्याचा प्रस्ताव.
२. ज्येष्ठ राज्यकर्ते अबू असीम
आझमी ह्यांना भारताचे
राष्ट्रपती बनण्याची ऑफर
३. विख्यात अतिरेकी दावूद इब्राहीम
ला अतिरेकी कारभारात उत्कृष्ट
कामगिरी साठी पद्म
विभूषण जाहीर !! वयोमानाने स्वास्थ्य
भिघड्ल्याने
पुरस्कार त्यांच्याघरी सुपूर्त .
४. प्रियांका गांधी -वढेरा ह्या कॉंग्रेस
च्या नव्या अध्यक्षा बनल्या .
५. लाल कृष्ण अडवानींचा १०६
वा वाढदिवस
साजरा ,पुढल्या निवडणुका जिंकून
पंतप्रधान
बनण्याची त्यांची इच्छा कायम .
६. कारागृहाधीराज भारत मान्य उच्च
अतिथी श्रीमंत. अजमलआमीर कसाब
ह्यांचा पन्नासावा वाढदिवस
मोठ्या जल्लोषात
साजरा,त्याच बरोबर
त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च
पुरस्कार निशान-ए-हैदर प्रदान करण्यात
आला !!
हा पुरस्कार स्वीकारताना कसाब
ह्यांनी आपले
मनोगत व्यक्त केले "
मी भारताचा ऋणी आहे.गेली पंचवीस वर्ष जे
प्रेम,भारतीय सरकार ने
आणि पोलिसांनी मला दिले
त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे.हे जेल
म्हणजे
माझे जणू माहेरघरच
आहे .मला कुठल्याही प्रकारचा त्रास
होणार
नाही ह्याची भारतीय सरकार
नि गेली पंचवीस वर्ष
काळजी घेतली आहे.माझ्या सर्व
पाकिस्तानी मित्रांना माझे एकच
आव्हाहन आहे
कि तुम्ही पाकिस्तानचा नाद
सोडा आणि भारता कडे
लक्ष द्या.इथली माणसे खूप
चांगली आहेत.इथे फार
छान पाहुणचार
केला जातो.अतिथी देवो भव: हे जणू
ह्या जेल चं ब्रीद वाक्यच आहे.श्रीमंत
आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी भारतीय
जेल
ची स्वारी करा,तिकडेइस्लामाबाद मध्ये
खिटपत बसू
नका.परत एकदा मी भारतीय
न्यायव्यवस्था आणि सरकार ह्यांचे आभार
मानतो आणि आपले भाषणइथेच संपवतो,पण
फक्त
एकच तक्रार आहे,ती म्हणजे माझ्या रूम
चा AC
बिघडला आहे ,तो जरा दुरुस्त करून
द्यावा ,धन्यवाद !!"
७. काश्मीर प्रश्न हा चर्चेतून सोडवू असे
आश्वासन
पंत प्रधानांनी आज दिल्लीत दिलं.
खेळ संबंधित बातम्या
८. सचिन तेंडूलकर ला भारत रत्न
पुरस्काराने
सन्मानित करण्याची मागणी;परंतु घटनेत
खेळ
कारकिर्दीला ह्या पुरस्कारासाठी अद्याप
सोय
नाही,त्या साठी नियमबदलावे
लागतील !!
९. पुढल्या वर्षी होणारा क्रिकेट विश्व
चषक
हा सचिन चा शेवटचा विश्व चषक असेल असे
तर्क
मांडले जात आहेत . ह्या संदर्भात प्रश्न
विचारल्यावर काही ज्योतिषी चक्कर
येऊन पडले,तर
निवृत्त होण्याचा विचार अद्याप मनात
आला नाही असे मास्टरब्लास्टर चे मत.
१०. ग्रेग चाप्पेल ह्यांचे आज
त्यांच्या निवास्थानी हृदय विकाराने
दुखद
निधन.हृदय विकाराचे कारण कदाचित
स्वप्नात
भारतीय टीम आली असावी असे वर्तविले
जात आहे.
११. भारताचे माजी फिरकी गोलंदाज
हरभजन सिंघ
च्या दोन्ही कुत्र्यांचे स्वास्थ्य खालावले,
त्यांना पाहण्यास काल रात्री symonds
आणि ponting पोहचले.
मनोरंजन पर बातम्या
१२. विक्रम गोखलेंनीवयाच्या ८५
व्या वर्षी सर्वात जलध एका तासात ३०
शब्द
बोलण्याचा विश्व विक्रम केला....त्यांचे
मनोगत
रेकॉर्ड करून रिमिक्स केल्यानंतरच
प्रकाशित
करण्याचा निर्णय घेण्यात
आलेला आहे ...त्यांचे
मनोगत हे २०० शब्दांचे आहे ...
१३. जेष्ठ सूत्र
संचालिका पल्लवी जोशी ह्यांची मराठी साहित्य
संमेलनाच्या अध्यक्ष
पदी निवड.त्यांच्या साठी एकदा जोरदार
टाळ्या झाल्या पाहिजेत !!
१४. चार दिवस सासूचे
ह्या मालिकेचा ५००००
वा प्रयोग प्रदर्शित .. देशमुख
घराण्यातील सर्व
मंडळी ठणठणित असून पुढली १० वर्ष
कोणाच्याही जीवाला धोका नसल्याचे
दिग्दर्शकाने
सांगितले आहे.
१५. सलमान खान
साठी मुली शोधण्यासाठी आरंभ
झालेला आहे..पुढल्या ५ एक वर्षात त्याचे
लग्न
करण्याचे त्याच्या घरच्यांनी योजिले आहे.
आजच्या बातम्या इथेच समाप्त
पुन्हा भेटूया १० वर्षांनंतर
- बातमीदार कोण आहे ते माहित नाही.

Wednesday, August 15, 2012

भारत हमको जान से प्यारा है..!

भारत हमको जान से प्यारा है,
सबसे न्यारा गुलिस्ताँ हमारा है....
सदियों से भारत भूमिदुनिया की शान है,
भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है....
उजड़े नहीं अपना चमन, टूटे नहीं अपना वतन,
गुमराह ना कर दे कोई,बरबाद ना कर दे कोई....
मंदिर यहाँ, मस्जिद वहाँ, हिन्दू यहाँ, मुस्लिम यहाँ,
मिलते रहें हम प्यारसे, जागो
हिन्दुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है....
जन्मभूमि है हमारी शान से कहेंगे हम,
सभी ही तो भाई-भाई प्यार से रहेंगे हम
हिन्दुस्तानी नाम हमारा है....
आसाम से गुजरात तक, बंगाल से महाराष्ट्र तक,
जाति कई, धुन एक है, भाषा कई, सुर एक है....
कश्मीर से मद्रास तक, कह दो सभी हम एक हैं...
आवाज़ दो हम एक हैं, जागो....

Tuesday, August 14, 2012

पण राग येतोच का म्हणून...??

...पण राग येतोच का म्हणून?
जे
इच्छेविरुद्ध घडते, जे स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो! म्हणूनच तर आपण सारेच रागावत असतो. कुणी अधूनमधून, कुणी सतत, कुणी प्रमाणात, कुणी प्रमाणाबाहेर, कुणी दुसऱ्यावर, कुणी स्वत:वर! परिणामांचा विचार करून किंवा त्याचा विचार करता! राग हे "रसायन' नेमके आहे तरी काय, याविषयी
...
मूल जन्म घेते, ही गोष्ट आपल्या दृष्टीने आनंदाची असते; पण त्याच्या शांत, स्वतंत्र अशा गर्भाशयातील जीवनाला एकदम अडथळा निर्माण होऊन गुदमरण्याची शक्यता वाटताच पहिल्या श्वासासाठीची धडपड (फाईट ऑर फ्लाईट ब्रेन रिस्पॉन्स) आणि त्याचे रडणे, ही खरे तर बाळाने व्यक्त केलेली पहिलीवहिली भावना - म्हणजेच त्याचा राग!
म्हणजे येतानाही इच्छा नाही आणि जातानाही इच्छा नाही आणि जे इच्छेविरुद्ध घडते, जे स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो! म्हणूनच तर आपण सारेच रागावत असतो. कुणी कधीतरी, कुणी सतत, कुणी प्रमाणात, कुणी प्रमाणाबाहेर, कुणी दुसऱ्यावर, कुणी स्वत:वर! परिणामांचा विचार करून किंवा त्याचा विचार करता!
"रागावणे चुकीचे' हे दुसऱ्याला सांगण्यासाठी! पण मी रागावलो ते योग्यच होते, असे समर्थन करणारे असतात कितीतरी जण.
एक गंमत सांगतो कुणावरही रागावणे तसे सोपे असते; पण योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य कारणासाठी, योग्य शब्दांत आणि योग्य प्रमाणात रागावणे फार कठीण काम आहे! अशा पद्धतीने रागावणारी माणसे किती आहेत, याचा आता आपल्याला शोध घ्यावा लागेल. त्याआधी आपण थोडी रागावर चर्चा करू या!
रागाच्या व्याख्या पुढील प्रकारे करता येतील.
-राग ही एक मनाची अवस्था आहे. ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते.
-मनाविरुद्ध घडणाऱ्या बाह्य घटनेला मनाने दिलेली ती एक नकारात्मक अशी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया होय.
-अपयश, ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळा, नैराश्, वैफल्य, संशय, भीती यांवर मात करण्यासाठी आपल्या मनाने ती उभारलेली एक प्रकारची प्रतिकार यंत्रणा असते.
रागाचे परिणाम
-रागावणारी व्यक्ती ज्या व्यक्तीवर रागावते, त्या व्यक्तीस मानसिक त्रास होतो. रागाचे प्रमाण जास्त आणि अयोग्य असेल तर समोरच्या व्यक्तीमध्ये नैराश्याची; तसेच तीव्र रागाची भावना निर्माण होऊ शकते. नंतर तो कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, हे सांगता येत नाही. यातून भांडण-तंटा, मारामारी किंवा इतर टोकाच्या घटना घडू शकतात.
-साधारणपणे आपल्या जवळच्या म्हणजे घरातील व्यक्तीवरच राग व्यक्त करण्याची सवय असते. कारण बाहेर आलेला राग त्या ठिकाणी व्यक्त करता येऊ शकल्याने अशा व्यक्ती तो राग दडपून टाकते. मग घरी आल्यानंतर ज्या व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहेत किंवा मृदू स्वभावाच्या आहेत, त्यांच्यावर हा राग काढला जातो. म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर!
-या अशा सतत व्यक्त होणाऱ्या रागामुळे घरातील मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. त्यांच्यामध्ये भीती, नैराश्, न्यूनगंडाची भावना आणि त्यातूनही पुन्हा रागाचा उद्रेक होऊन तो इतरांना घातक ठरू शकतो. म्हणूनच कौटुंबिक प्रगतीला अडथळा निर्माण होतो.
-राग अनावर असणाऱ्या व्यक्तीच्या सहवासातील व्यक्तींच्या मानसिकतेवर आणि व्यक्तिमत्त्वावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतात. नातेसंबंध बिघडतात, कामावर समाजव्यवस्थेचा परिणाम होतो.
-रागीट स्वभावाची व्यक्ती जर उच्चपदस्थ असेल तर रागाच्या भरात त्याने घेतलेला निर्णय समाजासाठी घातक ठरू शकतो.
रागावणाऱ्या व्यक्तीवर होणारे परिणाम
या व्यक्तीमध्ये
-मनोविकाराचे, तसेच शारीरिक आजाराचे प्रमाण जास्त असते.
- अस्वस्थता, बेचैनी, नैराश्याची भावना, मंत्रचळेपणा; तसेच रक्तदाब, मधुमेह, संधिवात, हृदयविकार, व्यसनाधीनता, आत्महत्येची प्रवृत्ती, अपघातांचे वाढते प्रमाण इत्यादींचे प्रमाण जास्त असते.
-काही रागीट व्यक्तींमध्ये राग, पश्चात्तापाची भावना, नैराश्, व्यसनाचा आधार आणि पुन्हा राग, पश्चात्ताप, नैराश् त्यातून इतरांना किंवा स्वत:ला इजा पोचवण्याची ऊर्मी अशी मालिका दिसून येते. म्हणजेच अनियंत्रित राग, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात दुष्परिणाम घडवून आणतो.
-एकूणच रागामुळे काहीही होऊ शकते. म्हणतात ना, अती राग आणि भीक माग!
आणखी एक गंमत !
-राग ही सर्वांमध्ये असलेली सर्वसाधारण भावना आहे.
-जी आपल्याला ओळखता आली पाहिजे.
-ती नियंत्रित करता आली पाहिजे.
-ती परिपक्व झाली पाहिजे.
-ती जपता आली पाहिजे.
-आणि मग ती आपल्याला फायदेशीर पण ठरू शकते.
-ज्यातून जीवन जगण्याची प्रेरणाही मिळते.
रागाची कारणे
) जीवशास्त्रीय घटक- टेंपोरेल लोब आणि लिंबिक सिस्टीम कारणीभूत
-विस्कळित स्वायत्त मज्जासंस्था
- ऍड्रेनॅलिनचे वाढते प्रमाण
- डोपोमिन आणि सिरोटोनिन यांचा सहभाग
) अनुवांशिक घटक - रागाची भावना आनुवंशिक असू शकते.
- XYY सिंड्रोम असणाऱ्या व्यक्ती
- अनुवांशिक व्यक्तीमत्व दोष
) मानसशास्त्रीय कारणे - तीव्र स्वयंकेंद्री असणाऱ्या व्यक्ती
- चुकीचे विचार आणि कल्पना यात गुरफटणाऱ्या व्यक्ती
- चिकित्सा करता मत बनवणाऱ्या व्यक्ती
- संशयी, आनंदी वृत्तीचा अभाव असणाऱ्या व्यक्ती
-न्यूनगंड, लैंगिक दमन
सिग्मंड फ्रॉईडचे मत जीवनविषयकप्रेरणा आणि मृत्यूविषयक विनाशी सुप्त प्रवृत्ती या दोन्हींचा ताण आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत माणसाच्या अशा वागण्याच्या मुळाशी असते.
लॉरेंझचे मत प्रत्येक सजीवामध्ये इतरांबरोबर सामना करण्याची उपजत वृत्ती असते. त्यातून संघर्ष आलाच !
आजची सामाजिक कारणे
व्यक्तीच्या अंगभूत जीवशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय बाबी जशा त्याच्या रागास कारणीभूत असतात, तसे समाजातील काही घटकदेखील आजच्या तरुणांमधील रागाचे कारण बनलेले आहेत.
- समाजव्यवस्था आणि त्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटना.
- वाढती लोकसंख्या आणि जीवघेणी स्पर्धा
- गर्दी आणि घुसमट
- रोजच्या गरजांसाठी करावा लागणारा संघर्ष
- राजकारणातील भ्रष्टाचार
- श्रीमंत आणि गरीब यांच्यात वाढत चाललेली दरी
- जातीयवाद आणि भेदभाव
-अंधश्रद्धा
- मीडिया हीरोला राग आलाच पाहिजे. कारण तो तत्त्वासाठी भांडतो. हाणामारी करतो आणि शेवटी तो जिंकतो. ही गोष्ट तरुणांमध्ये लवकर रुजते. आणि त्याच पद्धतीने आपणही वागावे, असे त्याला वाटू लागते.
-दूरदर्शनवरील मालिकांमुळे घराघरांतील समीकरणे बदलत आहेत.
राग व्यक्त करण्याचे प्रकार
1) शारीरिक सकर्मक-प्रत्यक्ष हाणामारी / शारीरिक इजा किंवा प्राणघातक हल्ला
2) शारीरिक सकर्मक-अप्रत्यक्ष दुसऱ्या माणसांच्या मदतीने समोरच्या व्यक्तीला शारीरिक इजा पोचवणे किंवा प्राणघातक हल्ला करणे
3) शारीरिक अकर्मक-प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीला त्याला हव्या असणाऱ्या गोष्टीपासून जबरदस्तीने परावृत्त करणे
4) शारीरिक अकर्मक-अप्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीला हवी असलेली मदत मुद्दाम करणे
5) मानसिक सकर्मक-प्रत्यक्ष व्यक्तीचा अपमान करणे
6) मानसिक सकर्मक-अप्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीबद्दल अफवा पसरविणे
7) मानसिक अकर्मक-प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीशी बोलण्याचे टाळणे
8) मानसिक- अकर्मक-अप्रत्यक्ष समोरची व्यक्ती संकटात असेल तर मदत करता तटस्थ राहणे
रागीट स्वभावाची माणसे आपल्या रागाचे समर्थन असे करतात -
- तुम्हाला मी आधीच सांगतो, मी खूप रागीट स्वभावाचा माणूस आहे. माझ्याशी वाकडेपणा घेऊ नका.
- मला खोटे बोललेले अजिबात खपत नाही.
- या घरात माझाच शब्द प्रमाण आहे. मी जे म्हणतो तसेच होणार!
- मी बघतो एकेकाला!
- मला सांगू नकोस, मी उडत्या पक्ष्याची पिसे मोजतो!
- मला विरोध करणारा अजून जन्मायचाय!
- तुझे जगणे मुश्किल करीन. अमूक अमूक म्हणतात मला!
- चल चालती हो! तुझ्यासारख्या छप्पन्न मिळतील मला!
- माझ्या दारात यायचे नाही. मी तुला मेलो आणि तू मला मेलास!
आणि अशी किती तरी...!
याउलट
काही वर्षांनंतर आयुष्य जेव्हा उतरणीला लागते, आयुष्य-सूर्याचा अस्त दिसायला लागतो, तेव्हा याच माणसांकडून खालील वाक्ये ऐकायला मिळतात -
-मी त्यावेळी तिला/त्याला असे तोंड सोडून बोलायला नको होते.
-थोडा संयम ठेवला असता तर तो प्रसंग मी टाळू शकलो असतो.
-आयुष्याची किंमत आता कळते.
-आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा. माणसाने माणसाशी दोन शब्द चांगले बोलले पाहिजे.
-आयुष्यभर लोकांना धाकात ठेवून तू काय मिळवलेस?
-आता वाटते, दुरावलेली माणसे जवळ यावीत; पण माझा स्वाभिमान आडवा येतो.
पण याच्याही पुढे काही महाभाग असतात, ते कधीच बदलत नाहीत.
बघा-
-मी आयुष्यभर कुणाला भीक मागितली नाही. आताही मागणार नाही.
-मी ज्या पद्धतीने वागलो, तेच बरोबर. "बळी तो कान पिळी' हेच मला पटते.
ही झाली काही उदाहरणे. अशी किती तरी माणसे तुम्ही तुमच्या आजूबाजूला शोधू शकता. अगदी तुमच्यासहित!
पण रागीट माणसांमध्ये काही गोष्टी तुम्हाला दिसतील त्या अशा-
- या व्यक्ती उतावळ्या स्वभावाच्या असतात.
- त्यांच्यात परिपक्वता कमी असते.
-सय् परिस्थितीची चारी बाजूंनी चिकित्सा करता लगेच मत व्यक्त करण्याकडे त्यांचा कल असतो.
-माझेच सर्वांनी ऐकावे, असे त्यांना वाटत असते.
-अशा व्यक्तीमध्ये न्यूनगंडाची आणि नैराश्याची भावना सुप्त प्रमाणात असू शकते.
-अशी माणसे स्वत:वरच नाराज असू शकतात; पण तसे दाखवत नाहीत.
-अशी माणसे व्यसनाधीन असू शकतात.
-या व्यक्तींना मूड डिसऑर्डर, स्किझोफ्रनिया, पॅरानोइया, डिप्रेन, ओसीडी (मंत्रचळेपणा) असे मनोविकार जडू शकतात.
रागावर नियंत्रण
-पहिली पायरी म्हणजे आपण रागावलो आहोत, हे ओळखणे किंवा मान्य करणे.
-इतके रागावणे योग्य आहे का, याचा विचार करणे.
-आपल्या रागावण्याचे आपल्याच मनावर, कुटुंबावर आणि शरीरावर काय परिणाम होतील, याचा विचार करणे
-समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वत: आहोत, अशी कल्पना करणे.
-आपला विचार, आपली मते सतत तपासून पाहणे
-माफ करणे, सोडून देणे या गोष्टी मोठ्या असतात. त्यांचा विचार करणे.
-आपला राग खरेच अनावर होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे.
काही उपाय
-संवाद साधण्याची कला प्रत्येकाने आत्मसात करावी.
-आपण आजपर्यंत किती माणसे जोडली, किती माणसे तोडली, याचा हिशेब करावा.
-इतरांना दोष देणे, त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे, हे किती योग्य आहे, याचा विचार करणे.
-आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागणे यात कमीपणा नाही.
-सतत उत्साही आणि उद्योगी राहावे.
-आपल्यामुळे इतर माणसेही कशी उत्साही राहतील, यासाठी प्रयत्न करावा.
आणि शेवटी
-आपले मन तरी आपल्याशी संवाद साधते आहे का, हे त्यालाच विचारावे आणि त्याला हेही विचारावे की "तू काय शोधत आहेस?, तुझे काय हरवले आहे?, तुला काय हवे आहे?'
बाहेरच्या देवाला साकडे घालण्यापेक्षा आणि नवस बोलण्यापेक्षा मनाच्या गाभाऱ्यातील मनोदेवतेलाच साकडे घालावे, मनात शांतता नांदावी म्हणून!